Friday, 14 August 2020

Pragmatic views of Dr.Panjabrao Deshmukh

Pragmatic views of Dr.Panjabrao Deshmukh


In the twentieth century, there have been sea changes in the country due to the vision and work of pragmatic leader in the country. Dr.Panjabrao Deshmukh was a pragmatic leader who devotes his entire life for the sake of downtrodden, peasants, and farmers and have not peoples. Well known philosopher Karl Marx remarked that “Many philosophers interpret the world in many ways. But the question is how to change it.” The philosopher who changed the world is recognized as pragmatic Philosopher and Dr.Panjabrao Deshmukh is one of the pragmatic Philosophers of the country.

Dr.Panjabrao Deshmukh worked in the field of education, agriculture, Social reformer, member of constituent assembly, Union Agriculture Minister and on various national and International Organizations. In the present paper attempts have been made to emphasize the pragmatic views of Dr.Panjabrao Deshmukh in the fields in which he worked and change the situation.

1. Pragmatic Views of Dr.Panjabrao Deshmukh:

1.1 Elimination of castes and Religions from Governments records

Dr.Panjabrao Deshmukh while speaking on the resolution of ‘elimination of caste and religion from the government records’ in constituent assembly on 17 Feb.1948  strongly opposed the resolution .He said that elimination of this poison (caste) from Hindu society is essential .He also agreed caste considerations are badly and are bad to the society. But he objects the way and potency and efficacy of the remedy suggested in the resolution. He elaborated his example of inter-caste marriage in 1927 and the dominance of caste in the society. He strongly opposed the resolution because the resolution was merely for non consideration of the caste factor for services. He pointed out that the services in India were occupied by upper caste and they do not allow others to enter in it. So Dr.Panjabrao Deshmukh opposed this resolution and appealed to make society with social justice having no discrimination of caste, religion   and gender. Dr.Panjabrao Deshmukh suggested that education system will eradicate the poison of caste in the society and will promote the inter caste marriages in the society. This is the rational and pragmatic view of Dr.Panjabrao Deshmukh in eradicating the caste in society.

 

1.2 Welfare of Peasants and farmers

In the era of globalization, India is facing the problem of farmer suicides. In spite of many packages, committees, suicides of farmers do not stopped. The reason behind this failure is lack of vision of government. Dr.Panjabrao Deshmukh while speaking on the welfare of peasants and farmers ,strongly appealed to establish welfare board for farmers on the line of social welfare board which will take care of farmers education, health and sanitation. He regrets that drafting committee of the constitution has not considered the problems of peasants and farmers in the country. He wrote a letter to Dr. Rajendra Prasad , Chairman of the Constitution Committee on 12 March 1948 to address the issues of farmers and lack of representation of farmers on the Constitution committee. He pointed out that the constituent assembly is dominated by non kisan and in constituent assembly the interest of poor peasants and labourers  who are the real masses of the India hardly get any place. the views of Dr.Panjabrao Deshmukh are Straightforward and pragmatic.

As a Union minister of Agriculture ,Dr.Panjabrao Deshmukh made a revolution in agriculture by introducing world agriculture technology to Indian farmers Community. He believed on exchange of technology and organized world agriculture exhibition at Delhi. Eisenhower ,the U.S. President visited India for inaugurating the world agriculture exhibition on 11th Dec 1959. Dr.Panjabrao Deshmukh published circular letters of his ministry to update all the state and union Ministers, Department about agriculture development and advancement. Dr.Panjabrao Deshmukh  took every efforts for welfare of peasants and farmers in the country. His commitments with rural peoples were strong and tried to uplift the rural people from heavy darkness of backwardness.

1.3 Education as a means of Social Change:

Dr.Panjabrao Deshmukh not only founded Shri Shivaji Education society but also made the provision on primary education by increasing the local cess by 50% in one deep which could embark on extensive program of compulsory education in the rural areas . Dr.Panjabrao Deshmukh considered the education as a means of social change. On the occasion of Silver Jubilee of Shri Shivaji education society in presence of Dr.S.Radhakrishanan ,Dr.Panjabrao Deshmukh declared his mission of education as follow. “Let other Universities devote their moneys and energies to production of only supermen .Let my Universities and Lokvidyapitha  strive to make useful, patriotic men and women out of ignorance ,filth,poverty and misery in the heavy darkness of India”.  The vision of Dr.Panjabrao Deshmukh was to uplift the rural masses from heavy darkness of backwardness through the education. The view of Dr.Panjabrao Deshmukh was of inclusive development and pragmatic.

Dr.Panjabrao Deshmukh founded Lokvidyapith on 30 Dec.1950 which was inaugurated by then President Hon.Dr.Rajendra Prasad. While giving the fact of education in India, Dr.Panjabrao Deshmukh quote the statement of Lenin who mentioned that in 1913,about four fifth of all children and young people in Russia are deprived of education. Dr.Panjabrao Deshmukh pointed out that the situation of education in India in1950 was as in Russia in 1913. So he emphasized the need of Lokvidyapitha who will cater the needs of all the sections of the society. In his speech, Dr.Panjabrao Deshmukh said ‘Workers educational Association ‘of England was a model worthy of imitation to us. The Workers educational associational Association of England is bigger than any Universities in Great Britain. 

Dr.Panjabrao Deshmukh was a pragmatic philosopher who established platform of education for the welfare of large masses irrespective caste, creed, religion, sex and any other discrimination.

1.4 Views on taking loan from IMF

In the era of globalization our governments tried to enhance the foreign investment for development in the country. This is one kind of imperialism and our dependency of foreign investment. In 1949 while speaking on the resolution ‘Financing reconstruction and development projects in India’ ,Dr.Panjabraoo Deshmukh alert the house about the interest of IMF and controlling of U.S. on I.M.F. He recommended using the Sterling credit of the country in the bank of England and in the world. He also recommended generating the funds within the country and minimizing the dependency of country on U.S. In this speech Dr. Deshmukh oppose this resolution and suggested many solutions for development projects. This economic views of Dr.Panjabrao Deshmukh were socialist and against the imperialism of World Bank.

1.5 As a social reformer

 Dr.Panjabrao Deshmukh was progressive and pragmatic social reformers who took the initiatives for opening Amba Devi Temple for untouchables and compel the trusty to allow untouchables in temple. The reason behind this movement was not only open the temple for untouchables but also to give the equal rights to deprived section of the society. Likewise Dr.Panjabrao Deshmukh started Shradhanand Hostel which was accessed by all the sections of the society. The work of Dr.Panjabrao Deshmukh was toward humanity and welfare of downtrodden people.

1.6 On Hindu Endowment Bill:

 Dr.PanjabraoDeshmukh was a scholar and worked on “Origin and Development of religion in Vedic Literature” for Doctoral degree in Oxford University. He realized that more property was inactive in Temple which was owned by many trust. He initiated to utilize this asset for social cause and prepared a resolution as “Hindu Endowment Bill”. This bill was very revolutionary but the house did not passed it. Now after 80 years of these initiatives of Dr.Panjabrao Deshmukh, we are the witness of massive assets in temple for e.g in Tamilnadu, asset own by Satya Sai Baba Trust. The people in India again demanding the nationalization of this asset for social cause. This is the success of pragmatic vision of Dr.Panjabrao Deshmukh.

1.7 On Parliamentary Democracy

Dr.Panjabrao Deshmukh warned on accepting parliamentary democracy. On speaking on draft constitution, Dr.Panjabrao Deshmukh said, parliamentary democracy is essentially meant for maintaining the status quo. It is not meant to bring about radical change from the existing state of affairs. Further he said, he would not be surprised if this constitution does not last long, because it does not answer the aspiration of the man in the street at the present time.

He observed that the principles of equality, liberty and fraternity adopted in constitution will lost their significance in two hundred years. Under these phrases it has been possible for various countries to maintain the upper layers where they were and to exploit the lower ranks to their hearts’ content. He warned there will have to be some sort of rebellion or revolution if we do not get proper representatives to run the government with this constitution.

Dr.Panjabrao Deshmukh was President of District council of Amravati, Member in Berar Council, Member of Constituent assembly, Union Minister of Agriculture. At international level he leads Food and Agriculture Organization (FAO) and worked for welfare of farmers in the world. He established Bharat Krishak Samaj and Shri Shivaji Education Society in the field of agriculture and education. These two organizations played an important role in the welfare of peasants and farmers in the region. The work of Dr.Panjabrao Deshmukh was at Local to global level and from education to Agriculture and from Religion to making of the constitution of India. Dr.Panjabrao Deshmukh worked with pragmatic vision to change the Indian society from heavy backwardness into progressive, scientific and rational society.

Reference:

Londhe S.R. ed. (1960) : Dr.P.S.Deshmukh’s Selected Speeches.

Valmiki Choudhari (1987): Dr.Rajendra Prasad Correspondence and selected documents .Allied, New Delhi, Vol.No.8, page no.141-143

 


भाऊसाहेबांच्या कृषक क्रांतीचे साक्षीदार कृषितज्ञ पद्मविभूषण प्रो.एम.एस. स्वामिनाथन यांची मुलाखत

 

भाऊसाहेबांच्या कृषक क्रांतीचे साक्षीदार कृषितज्ञ पद्मविभूषण प्रो.एम.एस. स्वामिनाथन यांची मुलाखत

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे सोबत काम केलेले जागतिक कीर्तीचे कृषितज्ञ पद्मविभूषण प्रो.एम.एस. स्वामिनाथन यांची मुलाखत घेण्याची  संधी श्री शिवाजी संस्थ्येचे अध्यक्ष मा.हर्षवर्धन देशमुख व संस्था कार्यकारिणी यांचे प्रोत्साहनामुळे मिळाली. दि.२२ नोव्हेंबर २०१८ ला चेन्नई येथे डॉ.एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फौंडेशन  येथे त्यांची मुलाखत घेण्यात आली. ९३ वर्षीय प्रो.एम.एस. स्वामिनाथन सकाळी १० वाजता त्यांच्या कार्यालयाला आले व डॉ.पंजाबराव देशमुख यांचे विषयी अतिशय आदर,सन्मान व सोबत काम केल्याचा अभिमान त्यांच्या उत्साहावरून व बोलण्यावरून जाणवत होता.देशातील शेतकऱ्यांचा आवाज असलेल्या डॉ.स्वामिनाथन आयोगाबद्दल सर्वांना माहिती आहे परंतु भारतीय कृषक क्रांतीचे शिल्पकार डॉ.पंजाबराव देशमुख यांचे सोबत त्यांनी केलेले कार्य, त्यांनी अनुभवलेले भाऊसाहेब व भाउसाहेबांची कृषक क्रांती समजून घेण्याच्या दृष्टीने सदर मुलाखत घेण्यात आली.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सोबत काम केल्याचे व त्याबाबत मत व्यक्त करतांना मला आनंद होत आहे .आपल्या देशाला पीएल 480   धान्यावर अवलंबून राहावे लागले .परंतु आज जगामध्ये फार कमी देशांमध्ये अन्नसुरक्षा अधिकार कायदेशीर जनतेला मिळाला त्यापैकी आपला देश एक आहे. हा बदल करण्याच्या संदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी पाया उभारणी केली. डॉ. पंजाबराव देशमुख हे कृषी क्रांतीचे दूत होते.

त्यावेळी भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या पुसा इन्स्टिट्यूट येथे गहु संशोधन केंद्राचा कार्यभार माझ्याकडे होता.डॉ.पंजाबराव देशमुख पुसा इन्स्टिट्यूट लायायचे.कारण त्यांचा विश्वास होता कि विज्ञान हे परिवर्तनाचे साधन आहे.त्यांना माहिती होते कि वैज्ञानिक संशोधनामुळे ग्रामीण भारताचा विकास होवू शकतो.ते म्हणायचे आपण फक्त प्रयोगशाळेमध्ये बसून चालाणार नाही तर वैज्ञानिक तंत्र प्रत्यक्ष शेती मध्ये परावर्तीत केले पाहिजे.

डॉ.पंजाबराव देशमुख भारताचे कृषी इतिहासामध्ये योग्य वेळी कृषिमंत्री झाले.त्यावेळेस शेती क्षेत्रासमोर खूप मोठी आव्हाने होती.त्यावेळी डॉ.राजेंद्र प्रसाद ,के.एम.मुन्शी जमीन संवर्धन व विकास याबाबत काम करीत होते.डॉ. पंजाबराव देशमुख यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा त्यांना नवीन कल्पना सुचली तेव्हा ते राज्यातील सरकारांना व मंत्र्यांना पत्र लिहायचे ती पत्रे खूपच प्रसिद्ध होते त्यांना माहिती होते की राज्य सरकारच्या पुढाकाराशिवाय शेतीची प्रगती होऊ शकत नाही म्हणून ते राज्य सरकारांना पत्र लिहायचे व त्या पत्रांचा बहुतेक वेळा मसुदा माझ्याकडे पाठवायचे

जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो व दरवाजावर परवानगी घेऊन आत जायचं तेव्हा ते म्हणायचे तुम्हाला परवानगीची गरज नाही तुम्ही माझेच फायद्याचे काम करतात भाऊसाहेब अगदी अनौपचारिक पद्धतीने वागायचे.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेक संस्था स्थापित केल्या.ते संस्था निर्माते होते.त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली

जेव्हा ते एकदा भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक संग्रहालयामध्ये चर्चा करीत होते.तेव्हा ते म्हणाले “जगामध्ये प्रचंड ज्ञान आहे त्याचा उपयोग आपल्या देशाला झाला पाहिजे त्याकरिता आपण जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित करू व आपले अनुभव सुद्धा  जगाला सांगू”.या पद्धतीनेजागतिक कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाचा निर्णय झाला.त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष आयसेन हावर जागतिक कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले होते.

मला विशेषत्वाने सांगावयाचे वाटते की दिल्लीमध्ये प्रथमच यानिमित्ताने प्रगती मैदान विकसित करण्यात आले. प्रगती मैदानाच्या विकासाची कल्पनाच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची होती.

नंतर प्रश्न आला की जागतिक कृषी प्रदर्शनाचा भर कशावर असावा.डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणाले “नवीन तंत्रज्ञान”.कृषी क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याकरिता जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य इमारत बांधण्यात आली.अणुऊर्जेचा वापर शेती क्षेत्रामध्ये तीन प्रकारे करता येतो.एक पिकांच्या नवीन प्रजाती विकसित करणे. म्यूटेशन या विषयावर मी करंट सायन्स या नियतकालिकामध्ये म्युटेशन मध्ये किरणोत्सर्गाचा वापर यावर लेख लिहिला.

त्यावेळेला डॉ.होमी जहांगीर भाभा हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे आम्ही दोघे गेलो डॉ.होमी जहांगीर भाभा यांना या प्रयोगाबद्दल  समजून सांगण्याची जबाबदारी डॉ.पंजाबराव देशमुखांनी माझ्यावर सोपवली.डॉ.होमी भाभा यांनी डॉ.पंजाबराव देशमुखांनबद्दल गौरवोद्गार काढले.ते म्हणाले मंत्री महोदयांना शेतीबद्दल प्रचंड आस्था व ज्ञान आहे.त्यांनी जागतिक कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले

 

शेतीच्या प्रश्नाबद्दल डॉ.पंजाबराव देशमुख राज्य सरकार यांना पत्र लिहीत.दुर्दैवाने आज महाराष्ट्र व केरळमध्ये दुष्काळाची स्थिती आहे.डॉ.पंजाबराव देशमुखांनी आमच्याकडे दुष्काळ आहे असे सांगितले नाही तर भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मात करण्याची तयारी त्यांनी केली.आज दुर्दैवाने राजकीय पक्ष दुष्काळासाठी एकमेकाला जबाबदार धरतात.दुष्काळ ही वस्तुस्थिती आहे व त्यावर मात करणे हे गरजेचे आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख हे शिक्षण तज्ञ होते,वैज्ञानिक होते,धोरणकर्ते होते,राजकीय नेते आणि दूरदृष्टीचे नेतृत्व होते.

 

कृषी क्षेत्रातील स्वावलंबन हे डॉ.पंजाबराव देशमुख यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही.दुग्ध उत्पादनाला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिले.आपण आज जगामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. हे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या दूरदृष्टीने शक्य झाले.

ते नेहमी म्हणायचे की देशातील शेतकरी फक्त पीक व पशुधनावर अवलंबून आहे.फक्त पिक किवा फक्तपशुधनावर अवलंबून न राहता त्याचा संयुक्त वापर शेती क्षेत्रामध्ये झाला पाहिजे. डॉ.पंजाबराव देशमुख सोबत काम केल्याचे नमूद करताना मला आनंद होत आहे.आम्ही जेव्हा परवानगी घेऊन त्यांच्या कार्यालयात प्रवेश करत असू तेव्हा ते म्हणायचे तुम्हाला परवानगीची गरज नाही.तुम्ही मला केव्हाही भेटू शकता कारण हे तुम्ही तयार केलेली संस्था आहे.

प्रश्न : सर,कृषी शास्त्रज्ञ म्हणून शेतीचे आधुनिकीकरण,अन्नसुरक्षितता व लक्षावधी लोकांना अन्न या डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या दृष्टीचे व कार्याचे मूल्यमापन आपण कसे करता?

 

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थायी अन्नसुरक्षेचा पाया घातला.1944 साले मी कोईम्बतूरच्या महाविद्यालयात गेलो.तेव्हाआपण अन्नधान्याच्या बाबतीत खराब स्थितीमध्ये होतो.भुकमरी आणि कुपोषणाचे प्रश्न होते.डॉ.पंजाबराव देशमुखांनी भुकमरी व कुपोषण संपवण्याचे प्रयत्न केले.म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताच्या अन्नसुरक्षितता नियोजनाचे निर्माते ठरतात.

आपण त्यांनी केलेल्या कार्याला,योगदानाला पुरेसा सन्मान देऊ शकलो नाही.लाखो शेतकरी त्यांची पूजा करतात.त्यांचा विश्वास होता की फक्त दिल्लीच्या कृषी भवनात बसून शेतकऱ्यांचा विकास होऊ शकत नाही.त्याकरिता शेतावर जाऊन आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे.

 

आज मी वृत्तपत्रांमध्ये  वाचले की मुंबईमध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी निदर्शने केली.आज समग्र शेतीविकासाचे धोरण राबविले पाहिजे.आम्ही राष्ट्रीय कृषी  आयोगाच्या अहवालामध्ये नमूद केलेले आहे. तीन सूत्र आम्ही मांडले.कृषी मालाची किंमत,कृषी मालाची खरेदी व सार्वजनिक वितरण.कृषी मालाची किंमत उत्पादन  खर्चाचा 50 टक्के अधिक असली पाहिजे.जास्तीत जास्तशेतमालाची खरेदी केली पाहिजेव शेतमालाची निर्यात केली पाहिजे.अन्नसुरक्षा कायद्यान्वये प्रति व्यक्ती पाच किलो धान्य निर्धारित केले आहे त्याकरिता सार्वजनिक वितरण व्यवस्था केली पाहिजे.

 

डॉ.पंजाबराव देशमुखांनी फलोत्पादनावर भर दिला;कारण फलोत्पादनामुळे पोषण सुरक्षितता मिळते.पिक उत्पादन,पशुधन,पशूपालन व मासेमारी या चारही विभागांवर भर दिला.त्यामध्ये पिक उत्पादन,पशूपालन, मासेमारी व फॉरेस्ट्री चे महत्व पर्यावरण दृष्टिकोनातून संतुलित ठेवते.

प्रश्न: आपल्या देशामध्ये कुपोषण,भुख व अन्नाचा तुटवडा यासारखे प्रश्न आहेत.डॉ.पंजाबराव देशमुखांनी यासंदर्भात केलेल्या कार्याचे मूल्यमापन आपण कसे करता.

 

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : मी नेहमीच म्हणतो के आपल्या देशामध्ये उंच पर्वत व लक्षावधी लोक उपाशी आहे.मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडे अन्न विकत घेण्याची आर्थिक ताकत नाही.पुरेशा अन्नाची उपलब्धता जे अन्न उत्पादनामुळे शक्य आहे,  अन्नाची प्राप्त होण्याची शक्यता क्रयशक्तीवर अवलंबून आहेव अन्नाची शरीरामध्ये प्रक्रिया पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहे,त्यामुळे अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अन्नाची उपलब्धता, प्राप्ती   व पचन महत्त्वाचे आहे.

डॉ.पंजाबराव देशमुखांनी भुकमरी व कुपोषण संपवण्याचे प्रयत्न केले.म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताच्या अन्नसुरक्षितता नियोजनाचे निर्माते ठरतात.

प्रश्न: कृषी शिक्षण संशोधन व विकास यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या दृष्टिकोन व कार्याकडे आपण कसे बघता.

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुख यांचा कृषी शिक्षण व संशोधनाबाबत दृष्टिकोन व्यापक होता.फक्त शिक्षण हे उच्च स्तरावर देऊन भागणार नाही तर ते प्राथमिक स्तरावर सुद्धा दिले पाहिजे,कारण शिक्षणामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मदत होते असे डॉ.पंजाबराव देशमुख यांना वाटत होते.त्यांचा दृष्टिकोन सर्वांत व्यापक होता.

प्रश्न : 1959 मध्ये डॉ.पंजाबराव देशमुखांनी पहिले जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले.या कृषी प्रदर्शनाचा भारतीय कृषी क्षेत्रावर काय परिणाम झाला?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन :यापूर्वी मी चर्चा केल्याप्रमाणे जागतिक कृषी प्रदर्शनाला अमेरिकेचे अध्यक्ष आयसेन हॉवर रशियाचे अध्यक्ष निकिता  कृश्चव्ह, डॉ.राजेंद्र प्रसाद व पंडित जवाहरलाल नेहरू इ.राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या.कृषी प्रदर्शनाला फक्त जागतिक राजकीय नेत्यांनीच भेटी दिल्या नाही तर जागतिक वैज्ञानिकांची सुद्धा ती परिषद होती.तिथे फक्त कृषी प्रदर्शन नव्हते तर वैज्ञानिक चर्चासत्र सुद्धा आयोजित केले होते.

जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर,कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास  यामुळे भारतीय कृषी क्षेत्राला प्रतिष्ठा मिळाली.डॉ.पंजाबराव देशमुखांनी जागतिक कृषी प्रदर्शनाकरिता उत्कृष्ट इमारत बांधली.त्याकरिता अमेरिकन तंत्रज्ञान वापरले.लोकांना असे वाटते की कृषी क्षेत्र म्हणजे गरीब किसान.त्यांना कमी महत्त्व दिले जाते.डॉ.पंजाबराव देशमुख म्हणायचे की मला कृषी क्षेत्राला प्रतिष्ठा द्यायची आहे व त्यांनी कृषी क्षेत्राला नवीन चेहरा दिला.

प्रश्न :  शेतीकरीता वित्तपुरवठा व शेतमालाचे विपणन हे दोन्ही प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न डॉ.पंजाबराव देशमुखांनी केले या प्रश्नाकडे आपण कसे पाहता?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : शेतीकरीता वित्तपुरवठा व शेतमालाचे विपणन या दोन्ही गोष्टी दुर्लक्षित आहे. मार्केट आणि मान्सून हे दोन्ही घटक शेतकऱ्यांचे जीवनमान ठरवते.मान्सूनचा लहरीपणा व मार्केटची अस्थिरता  शेतकऱ्यांसाठी घातक आहे.डॉ.पंजाबराव देशमुखांना शेतकरीकेंद्रित बाजारपेठ हवी होती.त्याकरिता त्यांनी प्रयत्न केले. ग्राहक केंद्रबाजारपेठ असावी पणत्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे.जर सरकारने डॉ. पंजाबराव देशमुखांनचे धोरण स्वीकारले  असते तर शेतकऱ्यांना निदर्शने करण्याची वेळ आली नसती. जेव्हा शेतकऱ्यांना निदर्शने करावी लागतात तेव्हा मला दुःख होते.डॉ.पंजाबराव देशमुख यांचे ज्ञान,अनुभव व कार्य आपण का स्वीकारत नाही?

प्रश्न: सर डॉ.पंजाबराव देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली व इतर कृषिविषयक संस्था व संघटना स्थापन केल्या.जसे ऑल इंडिया नॉन एडीबल इंडस्ट्रीज असोसिएशन, यंग फार्मर्स असोसिएशन, अखिल भारतीय ताडगूळ महासंघ, या संघटनांचे शेतकऱ्यांच्या विकासामध्ये योगदान काय?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुख यांनी कृषी संघटना व संस्थांमध्ये चांगल्या व्यक्तींची निवड केली.संघटना व संस्थेचे यश हे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर असते व संस्था शेतकरी केंद्रीय विचारावर चालते.जर हा दृष्टिकोन कमकुवत झाला किंवा सोडला तर त्याचा प्रभाव कमी होतो.हे आज आपल्याला दिसून येत आहे.डॉ.पंजाबराव देशमुख यांना त्याची कल्पना होती.आज बहुतेक शेतकरी संघटना ह्या कृषी तंत्रज्ञानापेक्षा राजकीय जास्त झाले आहेत.डॉ.पंजाबराव देशमुखांनी संघटनेला राजकीय महत्व एवढेच वैज्ञानिक व तंत्रज्ञानाला महत्त्व दिले.

प्रश्न: सर डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांवर कार्य केले फुड एन्ड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन,वर्ल्ड  फॉरेस्ट काँग्रेस, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एग्रीकल्चर प्रोडूसर, आणिमिल्सफोर मिलेनियम.आपण या कार्याचे कसे मूल्यमापन  करता?

 डॉ.एम.एस.स्वामिनाथन : मी त्यावेळेला तरुण संशोधक म्हणून  कार्य करीत होतो.जेव्हा डॉ.पंजाबराव देशमुख विदेशामध्ये जायचे तेव्हा ते परत आल्यानंतर त्यांचे अनुभव व निरीक्षण सांगायचे.डॉ.पंजाबराव देशमुख यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्यावर विश्वास होता,त्यांनी भारतात कृषी विद्यापीठाची पायाभरणी केली.पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांनी कृषी विद्यापीठाबद्दल कल्पना दिली.

प्रश्न: आपण हरित क्रांतीचे जनक आहात व डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्याचे वारसदार आहात. आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या “राष्ट्रीय कृषी आयोगाच्या अहवालाची अमलबजावणी मुळे शेतकऱ्याचे कल्याण होणार का?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच शेतकऱ्यांसाठी कृषी आयोगाचे गठन झाले.त्यामुळे राष्ट्रीय कृषी आयोग शेतकऱ्यांचा आवाज आहे.आम्ही विदर्भामध्ये शेतकर्यांसोबत संवाद साधला.डॉ.पंजाबराव देशमुखांचा सुद्धा हाच दृष्टीकोण होता.आपण शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण धोरण ठरविले पाहिजे.त्याकरिता आम्ही सर्व जण शेतकऱ्यांच्या स्थायी विकासाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय कृषी आयोगाचे काम करीत होतो.

 

दुर्दैवाने राष्ट्रीय कृषी धोरण न ठरविता क्षणिक कर्जमाफीचा उपाय सरकार स्वीकारतात. तो आवश्यक आहे  पण तो दीर्घ काळ साठी टिकणारा उपाय नाही.आपण डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्यातून शिकले पाहिजे कि शेती हा दीर्घकाळ चालणारा व्यवसाय असून तो फक्त अन्न सुरक्षिततेचा भाग नसून सांस्कृतिक सुरक्षिततेचा पाया आहे.

कृषी संस्कृती हि सर्व संस्कृतीची जननी आहे.जेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात जात असू तेव्हा तिथे लोकगीत ऐकायला मिळत.बहूतेक लोकांना शेतीचे व्यापक सांस्कृतिक,जीवनविषयक महत्व लक्षात येत नाही.डॉ.पंजाबराव देशमुखांनी हे महत्व ओळखले.कृषी हे जीवन व जीवनमानाचा आधारस्तंभ आहेत.

डॉ.पंजाबराव देशमुखांनसोबत आपल्या काही व्यक्तिगत आठवणी?

डॉ.एम.एस.स्वामिनाथन : डॉ.पंजाबराव देशमुखांनसोबत कार्य केल्याच्या स्मृती माझ्या मनात आहेत.तुमच्याशी बोलतांना माझे मन १९५८-५९ सालामध्ये गेले.विशेषत: जागतिक कृषी प्रदर्शनाच्या आठवणी ताज्या आहेत.त्यांनी कृषी विकासासाठी योग्य वेळी योग्य कार्यक्रम राबविलेत.पंजाबराव देशमुख हे ध्येयवादी होते.

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२० व्या जयंतीला, दि.२७ डिसेंबर ला अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थ्येच्या जयंती कार्यक्रमामध्ये सदर मुलाखत प्रक्षेपित होणार आहे.

मुलाखत कर्ते :

डॉ.रमेश अंधारे माजी प्राचार्य श्री शिवाजी कला व वाणिज्य    महाविद्यालय,अमरावती

डॉ.महेंद्र.वि.मेटे,ग्रंथपाल श्री श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय,अमरावती

metemahendra@gmail.com 9421739996

 

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व प्राध्यापकांचा लढा

 महाराष्ट्रातील उच्च शिक्षण प्राध्यापकांचा लढा

 जगातील सहावी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशाला मानवी विकासासाठी मात्र संघर्ष करावा लागतोजागतिक मानवी विकास अहवालामध्ये भारताचा क्रमांक एकशे एकतीस क्रमांकावर असून विकासामधील ही विषमता कमी करणे हे देशासमोरील प्रमुख आव्हान आहेउच्च शिक्षण हे मानवी विकासाचे प्रमुख साधन आहे. भारतीय राज्यघटनेच्या केंद्र सूचीतील क्रमांक 66 प्रमाणे उच्च शिक्षणाच्या किंवा संशोधनाच्या संस्था आणि वैज्ञानिक तांत्रिक संस्था यामधील दर्जाचे समन्वय निर्धारण ही केंद्र सरकारची जबाबदारी असून विद्यापीठ अनुदान आयोग 1956 च्या कायद्यानुसार ही जबाबदारी पार पाडतातत्यानुसार केंद्र सरकारने आपले सवैधानिक कर्तव्य म्हणून प्रोफेसर चव्हाण समितीचे गठन केलेदेशामध्ये एकूण 753 विश्वविद्यालय  पैकी 345 विश्वविद्यालय हे राज्य विश्वविद्यालय आहेतमहत्त्वाची बाब म्हणजे 94.5 टक्के पदवी चे विद्यार्थी 75. 4  विद्यार्थी पदवीत्तर विद्यार्थी हे संलग्नित महाविद्यालयातून शिक्षण घेतातम्हणूनच प्रख्यात वैज्ञानिक विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रोफेसर यशपाल यांनी, State University is the backbone of higher education system in India असे म्हटले आहे

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण

उच्च शिक्षणाच्या मानांकनामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहेदिनांक 16 ऑगस्ट 2018 पर्यत महाराष्ट्रातील 32 विद्यापीठे 1434 महाविद्यालय या उच्च शिक्षणाचा दर्जा निर्धारण संस्थेद्वारे मानांकित झाले आहे देशामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहेयामध्ये महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा शैक्षणिक घटकांचे महत्त्वाचे योगदान आहे.

 महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न

महाराष्ट्रामध्ये अनुदानित प्राध्यापकांच्या अकरा हजार च्या वर जागा रिक्त असून त्यांचे प्रमाण 42 टक्के एवढे आहे. एका बाजूला नेट सेट पीएचडी धारक तरुण उच्च शिक्षणाच्या करिअरची  अनेक वर्षापासून वाट पाहत आहे. परंतु ताज्या विद्यार्थी संख्येनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या गुणवत्ता जाहीरनामा नुसार प्राध्यापकांच्या पदांची संख्या ही मोठ्या प्रमाणात रिक्त आहे .त्याचे परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर पडत आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय उच्च तर शिक्षा अभियान 2013 पासून सुरू केले आहेसदर अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याकरता महाविद्यालय विद्यापीठांमध्ये किमान 70 टक्के प्राध्यापकांची संख्या असायला पाहिजेतसेच राज्य सरकारने प्राध्यापक भरती प्रक्रिया बंद नसल्याचे शपथपत्र द्यायचे असतेअभियानाच्या अंमलबजावणी करता महाराष्ट्र सरकारने असे शपथपत्र केंद्र सरकारला दिलेत परंतु    रुसाच्या समितीने महाराष्ट्र सरकार वर शेरा मारला की आम्हाला दुसऱ्या सूत्रानुसार कळते की महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक भरती प्रक्रिया बंद आहे रुसाच्या  नियमावलीचा भंग आहे’ . प्रोफेसर चव्हाण समितीने तर सातवा वेतन आयोग अहवालामध्ये अस्थाई प्राध्यापकांची पदे पूर्णतः कमी करून पूर्णवेळ प्राध्यापक नियुक्त करण्याची शिफारस केली आहेतसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची सेवा सहा महिन्यापेक्षा जास्त घेऊ नये त्यांची सेवा नियमित पदाकरता गृहीत धरावी त्यांना समान काम समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सहाय्यक प्राध्यापक पदाची वेतनश्रेणी द्यावी अशी सूचना केली आहे .अशा पार्श्वभूमीवर दीर्घकाळ प्राध्यापकांची पदे रिक्त असणे महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीला हानिकारक ठरणारे आहे.

 महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची भूमिका आंदोलन:

 महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने केंद्र सरकार द्वारे स्वीकृत केलेल्या अहवालाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याकरिता सुरुवातीपासून संघर्ष केला आहे .मुळात याकडे पाहण्याचा दृष्टी कोण फक्त प्राध्यापकांचे वेतन एवढाच नसून मेहरोत्रा समितीनुसार दर्जेदार शिक्षण प्रणाली करता समाजातील बुद्धिमान तरुणांना या क्षेत्राकडे वळविणे हा आहेत्याकरिता त्यांचे विशेषाधिकारशिक्षण संशोधन करता संधी आवश्यक आहेराज्याच्या आजच्या शैक्षणिक विकासाकरता महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे हे योगदान नाकारता येत नाहीमहासंघाचे बेमुदत काम बंद आंदोलन मुळात आपल्या आंदोलनातील सातव्या टप्प्यावर सुरू केले आहेयाआधी एक दिवसाची रजा आंदोलन जेलभरो आंदोलन , काळ्या फिती लावून निषेध, संचालक उच्च शिक्षण व  उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय वर आंदोलन करण्यात आलीत्याची कोणतीही दखल घेतल्याने प्राध्यापक महासंघाने दिनांक 25 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.प्राध्यापक भरती प्रक्रिया वरील बंदी उठवणे, समान काम समान वेतन प्रमाणे अस्थाई प्राध्यापकांना वेतन ,नवीन विद्यापीठ कायद्यानुसार नामित सदस्यांचे अतिरिक्त प्रमाण कमी करणे ,जुनी पेन्शन योजना लागू करणे ,सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे,71 दिवसांचे  प्रलंबित वेतन    सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे याकरिता प्राध्यापक आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या संरक्षणासाठी   न्याय हक्का करता लढत आहे .व्यावसायिक संघटना म्हणून प्राध्यापकांचे हित जपणे ही प्राध्यापक संघटनेची जबाबदारीच आहेमहाराष्ट्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्राध्यापक संघटनेशी चर्चा करावी राज्यातील शैक्षणिक वातावरणातील अस्थिरता दूर करावी.

 डॉ. महेंद्र विनायकराव मेटे अमरावती